विनोद मोहिते आणि त्याची प्रेयसी विशाखा आपटे या दोघांभोवती फिरणारी ही उत्तम कदम यांची कादंबरी आहे. कादंबरीच्या प्रारंभीच वधस्तंभाकडे जाणारा धीरोदात्त नायक विनोद मोहिते समोर येतो; मात्र, चमत्कार घडावा तशी त्याची फाशीची शिक्षा रद्द होते. फाशी रद्द होण्याचे कारण काय, मुळात त्याला फाशीची शिक्षा होण्याचे कारण काय, या सगळ्याची उत्तरे कादंबरीतून मिळतात.
गौतम बुद्धांची विश्वशांतीची शिकवण नायकाच्या माध्यमातून लेखकाने या पुस्तकात सांगितली आहे. जगाला शांती हवी आहे, असा संदेश ते देतात. हिंसा व शांतीबरोबरच तुरुंगातील आयुष्य, नात्यांमधील विश्वास आदी कंगोरेही कादंबरीत आहेत.
प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : २५६
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)